एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी.
लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक
गोष्ट विचारायचे धाडस
करू काय
? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच
परवानगी दिली
व म्हणाला ,
विचार काय
विचारायचे ते
.
तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व
प्राणी आले
पण ...! पण काय
.....? सिंह म्हणाला . महाराज
या प्राण्यांमध्ये मला
कोल्हा दिसला नाही
. नाही मी
सहज विचारलं या
कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर
नाही ,असे मला
वाटते .नाहीतर तो
एकदा तरी
येऊन गेला
असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे
येऊन उभा
झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द
कोल्ह्याच्या कानावर पडले
होते .तेव्हा कोल्हा शांतपणे
म्हणाला ,
महाराजांनी एकदा
माझे बोलणे शांतपणे ऐकून
घ्यावे नंतर काय
ते बोलावे. महाराज
आजपर्यंत एवढे
पशु आपल्या भेटीला आले
,पण कोणी
आपल्या आजाराचा उपाय
शोधला ?
या उपायासाठी मी
आजपर्यंत खटपट
करत होतो
व ते
औषध शोधल्यावरच मी
आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग
काय उपाय
शोधला तू
! महाराज औषध एकदम
रामबाण शोधल
आहे.
सांग बाबा
लवकर काय
ते औषध
आहे ,
सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते
औषध असे
आहे की
एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते
गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल
. त्याच क्षणी लांडगा तेथे
मारून पडला.
तात्पर्य :-कोणाचे कान
भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे
केव्हाही उत्तम !